ऋतू पावसाळी भुई रंग वेडी, फुलारून जाती वाटा अशा,
मातीतले अत्तराचे फवारे, नीलाम्बरी दशदिशा कोंदल्या...
निवतो असा देह या जल तुषारी, भेगाळल्या भूमी पान्हावतो,
कशा नीळ राशी धरुनी उशाशी, मुक्यानेच अंकुर फोफावतो !
फुलती कळ्या मोरपंखी दलांनी, पुन्हा मीच माझ्यात हुंकारतो,
दिशा मुक्त झाल्यात, इंद्राचाप पाण्यात, ओलांडुनी त्यास मी चालतो...
अश्या मंद वाऱ्यात ढगाआड ताऱ्यात तुझा स्पर्श वळिवात सामावतो,
किती दूर आलो जरी या प्रवाही, उरी मोगरा तोच गंधाळतो...
- डॉ अतिंद्र सरवडीकर
No comments:
Post a Comment